breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

राज्यात पावसाचा हाहाकार! कृष्णा आणि पंचगंगा नदी पातळीत वाढ, कोल्हापूर-सांगलीत पुराचा धोका

कोल्हापूर – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाचा फटका सर्वाधिक कोल्हापूर आणि सांगलीकरांना बसला असून सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीतही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सतत एकसारखा पाऊस कोसळत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदी धोक्याची पातळी पार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दोन बंधारे आणि एक पूलदेखील पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर शिराळा तालुक्यातील आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 59 बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा धोका वाढताना दिसत आहे. कोल्हापूरातील राधानगरी धरणातून देखील 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

अतिमुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतं आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी तर 23 फुटांवर गेली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला असून प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड पूर आला होता. यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. असंख्य जनावरं दगावली होती.

त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशार आपत्कालीन विभागानं दिला आहे. दुसरीकडे कोयना पाणलोट क्षेत्रातही मागील दोन दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात आणि नदीपात्रातही पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button