breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

राहुल गांधींनी सांगितलं संसदेत घुसखोरी करण्याच कारण; म्हणाले..

Rahul Gandhi : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबर रोजी लोकसभेत गदारोळ झाला. या प्रकरणाशी निगडित असलेल्या सर्व सहा आरोपींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यावरून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमागे काय कारण असावे यावद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

संसदेची सुरक्षा का भेदण्यात आली? याचा विचार करावा लागेल. देशात वाढलेली बेरोजगारी आणि महागाई ही कारणे या कृत्यामागे आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा  –  मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं? 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, संसदेत घुसखोरी करण्यात आली, हा गंभीर विषय आहे. आम्ही वारंवार बोलत आहोत की, या विषयावर गृहमंत्र्यांनी समोर येऊन भाष्य केले पाहीजे. पण गृहमंत्री समोर येऊन याबद्दल प्रतिक्रिया देत नाहीत. का झाले, कसे झाले, त्याचे कारणे काय आहेत? हे कुणीही सांगत नाहीत. टिव्हीवर ते तासनतास बोलत आहेत, पण लोकसभेत येऊन पाच मिनिटांची प्रतिक्रिया द्यायला त्यांना वेळ नाही. लोकशाहीच्यादृष्टीने ही चांगली बाब नाही. पण जे लोक लोकशाहीला मानतच नाही, त्यांच्याबाबत बोलणेही उपयोगाचे नाही.

काँग्रेसचे नाव घेऊनच भाजपा मते मागतात. नेहरू, गांधींना शिवीगाळ करून मताचा जोगवा मागितला जातो. त्यांचे कामच आहे की, काँग्रेसला शिव्या द्या आणि मत मागा, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button