पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार, धरणात पाणीसाठी किती?
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे. चिंचवडमध्ये देखभालीच्या कामासाठी पाणी कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला पाणी बचत करा अशा सुचना दिल्या आहेत. कारण, पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे नविन वर्षाच्या सुरूवातीलाच पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
पुणे शहरात पाण्याची बचत करा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला दिल्या आहेत. चार धरणात ७८.४७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हाच साठा ८८.४१ टक्के इतका होता. म्हणजेच, गतवर्षीपेक्षा दहा टक्के कमी पाणी चार धरणात आहे.
हेही वाचा – ‘शिंदे, अजितदादा कमळावर निवडणुका लढवणार’; शरद पवार गटातील नेत्याचा मोठा दावा
यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. त्यामुळे पुण्यातील धरणं ही १०० टक्के भरली नाहीत. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचे वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा अन्यथा जानेवारीपासून पाणीकपात करण्याचा इशारा महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देण्यात आला होता.
पुणे जिल्ह्यातील धरण साखळी पाणीसाठी (टक्केवारी)
- खडकवासला : ७७.०७ टक्के
- पानशेत : ८८.२७ टक्के
- वरसगाव : ८२.०५ टक्के
- टेमघर : ३८ टक्के.