breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई – काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राजकारणात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय. त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केलं होतं, असं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यातच आता पुन्हा प्रताप सरनाईक यांच्यावर अटकेची तलवार लटकलेली दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी ईडीने सूडबुद्धीने कारवाई करू नये, यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक करू नये, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा पूर्वेश, विहंग तसेच मेहुणा योगेश चांदेगला यांनीही याचिका दाखल केली आहे.

प्रताप सरनाईक यांच्या विहंग व आस्था ग्रुपने विकासक योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा पूर्वेश, विहंग तसेच मेहुणा योगेश चांदेग यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.

दरम्यान, काही दिवसापुर्वी ईडीच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईकांच्या मानेवर ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले होते. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असंही आदेशात नमूद करण्यात आलं होतं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button