breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यातील सर्व जागा लढवणार’; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व ४८ जागा लढणार असल्याचं, प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसला प्रस्ताव हवा होता, तो आम्ही या पत्राच्या माध्यमातून दिला. परंतु त्यावर काँग्रेसने कसलेही उत्तर दिलेले नाही. दुसरे असे की, राज्यात शिवसेना (ठाकरे गट) व वंचित आघाडीची युती आहे. परंतु शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे शिवसेना व वंचित आघाडीतील जागावाटपाची चर्चाही थांबलेली आहे. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व ४८ जागा लढणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा – दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात करीत आहोत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button