Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘कसब्यातील एका भूखंडावरून धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले’; संजय राऊतांचा दावा

मुंबई | पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर दबाव असल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, की एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट किंवा भाजपामध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश हे भीतीपोटी सुरू आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटीच पक्षांतर केले होते. अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांनीही याच भीतीपोटी पक्ष सोडला. एखाद्याने पक्षप्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते. जुन्या प्रकरणांवरून दबाव आणला जातो. रवींद्र धंगेकर यांनी पक्षांतर का केले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून सांगितले पाहिजे. कसबा विधानसभेतील गणेश पेठेत एक जमीन त्यांची पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर भागीदार यांच्या नावावर आहे. त्या जागेची आजची किंमत ६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यानतंर लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाच्या वतीने सदर जमीन वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून न्यायालयात धाव घेण्यात आली. या माध्यमातून धंगेकर यांचे काम अडविण्यात आले आहे.

हेही वाचा  : ‘मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोचं जाळं वाढणार’; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा!

धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली. धंगेकर यांनी पक्ष सोडावा, असे वातावरण तयार करण्यात आले. इतकी मोठी गुंतवणूक करूनही जर खटले दाखल होत असतील, पत्नीला अटक होणार असेल तर त्या भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटाला प्यारे झाले. फक्त धंगेकरच नाही तर यापूर्वी ९० टक्के प्रकरणात भीतीपोटी पक्षांतर झालेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांच्या दाव्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कर्ज काढून गणेश पेठेतील जागा विकत घेतली होती. त्या व्यवहारात कोणतीही फसवणूक नव्हती. तरीही भाजपाच्या लोकांनी त्या कामात अडथळा निर्माण केला. जर वक्फ बोर्डाची जागा असेल तर मुस्लीम बांधवांनी आक्षेप घेतला पाहीजे. पण आक्षेप घेत आहे, भाजपाचे लोक. यातूनच मला अडकविण्याचे त्यांचे धोरण असल्याचे दिसून येते. ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न झाला. तसेच मला त्रास दिला गेला असला तरी पक्ष बदलण्याचे कारण हे नाही तर वेगळेच आहे, असेही धंगेकर म्हणाले. मी कुणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही. मी विकासकामांसाठी शिवसेना (शिंदे) पक्षात आल्याचेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button