राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे दिल्लीत प्रतिपादन
अहिंसेच्या महत्वावर देखील जोर दिला आणि म्हटले की जगाला भारताला पारंपारिक ज्ञानाचा नवा मार्ग मिळू शकतो

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात धर्माची व्याख्या सांगताना केवळ पूजा अर्चा म्हणजेच धर्म नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. त्यांनी हिंदू समाजाला आपल्या धर्माबद्दल खोल ज्ञान विकसित करुन त्याला जगासमोर योग्य प्रकारे आणण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अहिंसेच्या महत्वावर देखील जोर दिला आणि म्हटले की जगाला भारताला पारंपारिक ज्ञानाचा नवा मार्ग मिळू शकतो असे म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की राजाने केवळ पूजा अर्चना केली कर्मकांड केले म्हणजे भागले असे नाही. धर्म हा जीवन जगण्याची संहिता आहे. आज ही वेळ आली आहे की हिंदुसमाजाने आपल्या धर्माची खरी ओळख जगासमोर योग्य स्वरुपात आणावी, यावेळी पुढे म्हणाले की राजाचा धर्म हा प्रजेची रक्षा करणे असतो…
‘काही इतके बिघडलेत की ते उपद्रव करतील’
भागवत पुढे म्हणाले की, अहिंसा हा आपला मूलभूत स्वभाव आहे. आमची अहिंसा लोकांना बदलण्यासाठी आहे. परंतु काही इतके भ्रष्ट आहेत की ते गोंधळ निर्माण करतील आणि ऐकणार नाहीत. रावचा बद्ध देखील त्याच्या कल्याणसाठी झाला होता. तो बदलू शकला नाही म्हणून देवाने त्याला नष्ट केले, जेणेकरून तो नवीन जीवन मिळवू शकेल आणि सुधारू शकेल. जर अहिंसा हा आपला धर्म असेल तर गुंडांकडून मार न खाणे हा देखील आपला धर्म आहे. ज्यांना सुधारता येत नाही त्यांना अशा ठिकाणी पाठवले जाते जिथे त्यांचे कल्याण होईल. आम्ही आमच्या शेजाऱ्यांना कमी लेखत नाही. प्रजेचे कल्याण ही राजाची जबाबदारी आहे, तो त्याचे कर्तव्य पार पाडेल, तो त्याचा धर्म आहे, तो ते करेल.
हेही वाचा – गाईंना गुंगीचे औषध देऊन तस्करी करण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांवर तात्काळ कारवाई करा, पंकजा मुंडेंचा आदेश
भागवत म्हणाले- नवा मार्ग भारताच्या दिशेने आहे
ते पुढे म्हणाले की, आज जगाला एका नवीन मार्गाची आवश्यकता आहे. गेल्या २००० वर्षात अनेक विचारसरणींच्या स्वरूपात केलेले अनेक प्रयोग फळाला आलेले नाहीत. सुख वाढले, पण काहींसाठी ते वाढले तर काहींसाठी ते कमी झाले. समाधान मिळाले नाही. दुःखही वाढले. नवीन सुविधा आल्या पण, नवीन आजारही आले. विकास झाला तेव्हा पर्यावरण प्रदूषित झाले. जगाच्या मानवतेसाठी भारताकडे एक नवा मार्ग दिसत आहे.
मूळ विचारांवर शेकडो वर्षे काम झालेले नाही… भागवत म्हणाले
भारताकडे अशी परंपरेची दृष्टी आहे. आमचा विचार पारंपारिक आहे. गेल्या १२०० ते १५०० वर्षांत आपल्या पारंपारिक कल्पनेवर, आपल्या मूलभूत कल्पनेवर काम झालेले नाही. जेव्हा आपण जगाला संपत्ती आणि धर्मग्रंथ देत होतो, तेव्हा आपण सुरक्षित आणि समृद्ध होतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये जात, पंथ आणि भेदभाव अस्तित्वात होता की नाही यावर उडुपीतील सर्व संतांनी आत्ताच एकमताने पुराव्यांआधारे म्हटलेय की आपल्या समाजात नव्हते.