Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कडाक्याच्या उन्हाने पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

पवना धरणात 37 टक्के पाणीसाठा

पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पिंपरी चिंचवड :  यंदा कडाक्याच्या उन्हामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. अल्हाददायक, पर्यटन स्थळ समजले जाणाऱ्या मावळ तालुक्यातही कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. पवना धरणात ३७टक्के, वडिवळे ४० टक्के तर आंद्रा धरणात ४० टक्के पाणीसाठा आहे. अद्याप मे महिना संपायचा बाकी असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा –  भूसंपादनासाठी १४ अभियंत्यांची समिती गठीत

पिंपरी-चिचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या शिवाय पवना व आंद्रा धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर मावळातील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. उन्हाळ्याचा अद्याप एक महिना बाकी आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील पवना धरण हे सर्वात मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहती, ग्रामपंचायतीच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

सध्या पवनाधरणात ३७ टक्के पाणी साठा आहे. पिंपरी-चिचवड व मावळातील गावांसाठी गेल्या दोन दिवसांपासून एक हजार क्यूसेकने पाणी सोडले आहे. उन्हामुळे बाष्पीभवन वाढून धरणातील जलसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

– रजनीश भारिया, शाखा अभियंता पवना धरण

वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत आणि अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवत केला जातो. सध्या धरणात ४० टक्के पाणीसाठा आहे.

– संतोष शिंदे, अभियंता वडिवळे धरण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button