#pcmc: योग्य नियोजन अभावी पिंपरी-चिंचवडमधील भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद
पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योग्य नियोजन अभावी भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात भाडेकरू स्थायिक आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने शहरात परिस्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामध्ये माजी महापौर यांनी केलेल्या आवाहनाने शहरातील मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या भाडेकरू यांच्या मध्ये एक प्रकारे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी महापौर यांनी लॉकडाउन च्या काळात भाडेकरू यांना महापालिकेच्या निवारगृहात बेघर आणि विस्थापित नागरिकांना महापालिकेच्या वतीने मोफत अन्न पुरविण्यात येणार आहे व काही गरजू व्यक्तीच्या बँक खात्यात महापालिकेतर्फे काही रक्कम टाकण्यात येणार आहे, असे आवाहन केले
ज्या खोली मालकांच्या येथे हे भाडेकरू वास्तव्यास असतील त्यांनी पुरावा माजी महापौर यांच्या संपर्क कार्यालयात देण्यात यावा असे सांगण्यात आले. या विषयी या माजी महापौर यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली त्यामळे भोसरी विधान सभेमध्ये मोठ्या प्रमाणात ही माहिती पसरली. विशेषतः या परिसरात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने कामगार यांनी महापालिका करत असलेल्या सर्वेक्षण भागात मध्ये मोठ्या प्रमाणात माहिती देण्याचा बहाण्याने गर्दी करत असल्याचे दिसून आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी तातडीने परिपत्रक काढून असे सांगण्यात आले की दि.२७/४/२०रोजी ठराव क्र.कर/मुख्य/९/कावी१२५/२०२० रोजी निर्देश देण्यात आले होते.
मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी यांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले होते पण वाढती गर्दी पाहता अनेक गैरसमज पसरत आहेत. त्या अनुषंगाने कोणत्याही भाडेकरूंच्या बँक खात्यामध्ये महापालिकेतर्फे रक्कम जमा करण्याचे अथवा कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे धोरण निश्चित अजून पर्यंत करण्यात आलेले नाही. याविषयी महापालिकेतर्फे करण्यात येणारे सर्वेक्षणाचे कामकाज तातडीने थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे असे अतिरिक्त आयुक्तांनी परिपत्रक कडून प्रसिद्ध केले आहे.या विषयी योग्य नियोजन केले नसल्याने महापालिकेतर्फे समोर आले आहे.
मात्र, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात या योजनेची काहीच माहिती का प्रसिध्द करण्यात आली नाही यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.एका विशिष्ट मतदार संघात ही योजना अंमलात आणायची होती का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या नगरसेवकांनी शहरातील भाडेकरूंना या विषयी का माहिती दिली नाही अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.एरव्ही मदतीच्या नावाखाली चमकेगिरी करणारे नगरसेवक का गप्प राहिले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराचे महापौर यांनी नगरसेवकांना ५ लाख रुपयांची मदत महापालिकेने करावी हे जाहीर केले मग भाडेकरूंसाठी ची योजना का? जाहीर केली नाही अशी चर्चा शहरवासियांमध्ये सुरू आहे. मात्र या अफवेने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली आहे हे तितकेच खरे आहे.त्यामुळे योग्य माहितीच्या आधारे नागरिकांनी खातरजमा करावी असे सांगण्यात आले आहे.