Maharashtra Rain : सिंधुदुर्ग, सोलापूरला ऑरेंज अलर्ट, तर ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच पुढचे काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा – ‘पोपटराव पवार काम करतात, मात्र अमिर खान क्रेडीट घेऊन जातो’; महेश मांजरेकरांचं मोठं विधान
सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, पुणे , सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर पुणे शहरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात ५ जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांना ३, ४, ५ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.