breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

उठसुट राजीनामा मागणं असा उद्योग विरोधकांचा सुरु झालाय- संजय राऊत

मुंबई – माझी आणि शरद पवार यांची भेट झाली. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शरद पवार हे आता दिल्लीत येतील. सरकार विरोधी पक्षासाठी चालत नाही. ते राज्यासाठी, जनतेसाठी चालतं. विरोधकांकडे बहुमत असले तर विरोधकांनी सरकार स्थापन करावे. विरोधकांची प्रत्येक मागणी ही सत्यावरच आधारलेली असेल असं नाही. त्यांनी एखादी मागणी केली असेल. उठसुट राजीनामा मागणे असा उद्योग विरोधकांचा सुरु झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

वाचा :-गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? जयंत पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय कोणालाही नोकरीवर घेतलं जात नाही. आमच्यासाठी वाझे हा विषय आता संपला आहे. जुलिओ रिबेरो यांनी राज्यातील या प्रकरणावर एक लेख लिहला आहे. त्यांनी जर या प्रकरणाची चौकशी केली. तर त्यांच्या अहवालावर सगळेच विश्वास ठेवतील.मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख आहेत. अनिल देशमुख यांच्याविषयी तेच निर्णय घेतली. सरकार आहे. आपापले राजकीय पक्ष आहेत. त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते सगळे निर्णय घेतील, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, दिल्लीतील संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक संपली. खासदार सुप्रिया सुळेसुद्धा बैठकीला उपस्थितीत होत्या. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित होते. आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जंयत पाटील आणि अजित पवारसुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button