पवार आणि शिंदेनी सावध रहावे; प्रकाश आंबेडकरांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले. यामधून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली.
कोणाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, काय नेमके बदल केले आहेत याच्या पलीकडे काय आहे, नवीन बदल काय आणि त्याने काय बदल घडवले आहेत? महिला बालविकासचे जर काही क्रेडिट असेल तर ते एकनाथ शिंदे यांना जाईल. कारण त्यांनी १५०० दिले त्यामुळे कंजूम पॉवर वाढली आहे असे प्रकाश आंबडेकर म्हणाले.
हेही वाचा – तुळजापूर ड्रग्सवरुन जुंपली, ओमराजे निंबाळकर अन् राणा पाटलांमध्ये पालकमंत्र्यांसमोरच खडाजंगी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, नाही तर अजगर कधी गिळणार हे त्याना कळणार नाही असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला वाटतं. ही अस्तित्वाची लाढई आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर देखील निशाणा साधला आहे. दोन्ही पवार वेगळे नव्हते तेव्हाच सांगितले होते, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.