breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Lockdown: अन्नधान्याचा तुटवडा नाही
शहरातील मुख्य भुसार बाजार बंद असला, तरी किरकोळ किराणा माल विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत. व्यापाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे. गेले पावणेदोन महिने व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवहार सुरळीत ठेवले. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. बाजार समितीकडून पुढील चार दिवसांत उपाययोजना केल्या जातील. त्यानंतर येत्या शनिवारी व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक होईल. या बैठकीत बंदबाबत व्यापारी भूमिका मांडतील, असे दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.