महाराष्ट्रात येत्या 48 तासांत विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज
मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच पूर्व मुंबईत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Next 48 hours many parts of Interior Maharashtra will get rains & thunderstorms during evening/night. Mumbai especially regions east of Mumbai also have small chance of light rains.
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) April 14, 2021
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, भंडारा वाशिम जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 16 एप्रिलला यवतमाळ, वाशिमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर कोल्हापूर, हिंगोली, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तर ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्वारी, गहू ,कडबा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी बेदाणा शेड उडून गेल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.