ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

पाकड्यांनो, सहनशीलता संपली, आता मात्र, घरात घुसून मारणार?

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा ‘लष्कर-ए- तोयबा’ या पाकिस्तान पुरस्कृत संघटनेच्या दहशतवाद्यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यातील चार दहशतवादी हे संपूर्ण लष्करी प्रशिक्षण घेऊन १५ दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यात घु
आता शंभर पापे भरली..

म्हणतात ना, कोणतीही जहाल शिक्षा देण्यापूर्वी त्याची १०० पापे भरावी लागतात.. आता पाकिस्तानला एवढेच सांगावे वाटते, की तुमची शंभर पापे भरली आहेत, बरं का ! या भ्याड हल्ल्यात सत्तावीस निष्पाप हिंदू मारले गेले, ही गोष्ट फारच क्लेशदायक आहे. सौदी अरेबियाचा दौरा गुंडाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी तडकाफडकी भारतात दाखल झाले..गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला पोहचले.. आणि सर्व वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला.. वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.. सगळेच ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले!

मोदी, शाह, जयशंकर, राजनाथ, डोवल..

अगदी वरिष्ठ पातळीवर बैठकांचा कानोसा घेतला तर नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा आणि त्यांच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बैठकांचा सिलसिला अव्याहतपणे सुरू आहे. राजनाथ सिंग यांनी तर नौदल, हवाईदल आणि लष्कराच्या प्रमुखांची बैठक घेऊन सल्लामसलत केली.

काहीतरी मोठं घडणार आहे !

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावले टाकली जाणार असून आता काहीतरी मोठे घडणार आहे, हे लक्षात ठेवून प्रतीक्षा करायला हवी. पाकिस्तानला आता एकच सल्ला द्यावासा वाटतो.. भारताची सहनशीलता संपली आहे, आता घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे ! सध्या, केंद्रात कडव्या देशप्रेमी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. पूर्वीच्या सरकारांसारखे केवळ निषेध करून हे गप्प बसणारे सरकार नाही, हे जसे पाकिस्तानला माहीत आहे, तसेच भारतातील जनतेलाही माहीत आहे. त्यामुळे, मोदी सरकारची पुढील कडवट पावले कोणती, याकडे संपूर्ण देश लक्ष लावून बसला आहे !

सैन्याच्या तिन्ही दलांना सतर्कतेचे आदेश

भारतीय सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीच्या साऊथ ब्लॉक मधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, अजित डोवल आणि संरक्षण खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची झालेली बैठक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर म्हणजे बुधवार दुपारनंतर पाकिस्तानविरोधी हालचालींना चांगलाच वेग आला आहे. या बैठकीअंती तिन्ही दलाच्या प्रमुखांना आपापले सैन्य सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या, यातच काय ते आले !

वायुदल – नौदल आदेशाच्या प्रतीक्षेत..

या महत्वपूर्ण बैठकीनंतर भारतीय वायुदल आणि नौदलाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा, असे सैन्यदलाला स्पष्ट शब्दात सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अथवा एक-दोन दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते, याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत. गेल्या काही तासांपासून दिल्लीत राजकीय आघाडीवर वेगवान घडामोडी मात्र सुरू आहेत.. उच्चस्तरीय बैठकांचा सिलसिला सुरूच आहे.

अमितभाईंकडून हल्ल्याचा आढावा..

पहलगाम येथे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला झाला, त्या ठिकाणी उपस्थित राहून अमित शाह यांनी फिरून पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा देखील केली. हल्ला कसा झाला, त्याची पार्श्वभूमी.. याची सखोल माहिती त्यांनी घेतली असून हा सविस्तर अहवाल ते सायंकाळपर्यंत नरेंद्र मोदी यांना सादर करणार आहेत. हे सुरू असतानाच तिकडे संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ अनिल चौधरी यांची प्रदीर्घ काळ बैठक सुरू आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्या बैठकांमध्ये नरेंद्र मोदी सहभागी होत असल्याची माहितीही पुढे असून त्यांनी आपल्या कार्यालयात ‘वॉर रूम’ मध्ये बैठक मारली आहे.

पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर थेट पाकिस्तानातील दहशतवादी नेत्यांच्या संपर्कात होते आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. तेथील कुख्यात दहशतवाद्यांची गेल्या आठ दिवसांच्या भाषणांनी सुद्धा या हल्ल्याला खतपाणी घातल्याचे स्पष्ट होत आहे, हे नक्की !

हेही वाचा –  ‘असा बंदोबस्त करा की हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल’; राज ठाकरे

डिजिटल पुरावे जोडले गेले

तपास यंत्रणांना घटनास्थळी अतिशय अत्याधुनिक संवाद साधने सापडली असून, ती पाकमधील मुझफ्फराबाद आणि कराची येथील ‘सेफ हाऊस’ शी जोडलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दहशतवाद्यांच्या डिजिटल पाऊलखुणा पाकिस्तानी नेटवर्कशी जोडल्या गेल्याचा ठोस पुरावा भारतीय यंत्रणांना मिळाला आहे. हे सर्व पुरावे पाहता या हल्ल्यामागे पाकिस्तान शिवाय दुसरे कोणीही नसल्याचे दिसून येते.

अत्याधुनिक शस्त्रांचा वापर..

फॉरेन्सिक तपासणीत हल्लेखोरांकडून लष्करी दर्जाची शस्त्रे वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे ड्रायफ्रुट्स, औषधे, कम्युनिकेशन उपकरणे व बॉडी कॅमेरे असलेली पिशवी होती. पाच ते सहा दहशतवाद्यांची टोळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पहलगाम मधील बैसरण परिसरात रेकी करून पूर्ण तयारीनंतर हल्ला करण्यासाठी सज्ज झाली होती. यावेळी तीन ते चार दहशतवाद्यांनी एके- ४७ ने गोळीबार केल्याचा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. त्यांनी काही क्षणात ५० फैरी झाडल्याचेही स्पष्ट झाले आहे.

‘टी आर एफ’ ने घेतली जबाबदारी..

मूळ दहशतवादी संघटना ‘लष्कर – ए – तोयबा’ ची अतिशय कडवी शाखा असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ( टी आर एफ ) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्याच्या वेळी पश्तो भाषेत बोलणारे दोन पाकिस्तानी दहशतवादी होते आणि आदिल तसेच आसिफ या दोन स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाग होता. हे दोन स्थानिक दहशतवादी बिजभेरा आणि त्राल येथील आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सांगितली आहे. तसेच या हल्ल्यात सहभागी असलेल्यांपैकी एक, आसिफ फौजी, हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त अधिकारी आहे.

मुंबईतील २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती ?

एकूणच या दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप पाहता, त्याची मुंबईतील २६/११ हल्ल्यासारखी रचना असल्याची शक्यता आहे. हल्लेखोरांनी बॉडी कॅमेऱ्यांद्वारे सर्व घटना रेकॉर्ड केल्याची माहिती आहे. यावरून या हल्ल्याचा उद्देश केवळ हिंसा नव्हे, तर काश्मीरमधील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणे हाच असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोदीजी, बदला घ्या..देश पाठीशी आहे..

आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे, ती म्हणजे गेल्या वर्षभरात काश्मीर खोऱ्यात १४४ दहशतवादी मारले गेले आहेत. अजून विविध ठिकाणी १२० दहशतवादी सक्रिय आहेत, त्यापैकी ११० हे पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आले आहेत, तर दहा स्थानिक दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या हाती आली आहे. संपूर्ण देशामध्ये आता संतापाची लाट पसरली असून नरेंद्र मोदी हे कोणते पाऊल उचलतात, त्यांनी पाकिस्तानात घुसून बदला घ्यावा आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी, अशी मागणी संपूर्ण देशात अनेक ठिकाणी निघालेल्या निषेध मोर्चामध्ये करण्यात आली आहे.

मोदीजी हिंदुत्ववादाचे कट्टर पुरस्कर्ते..

मोदीजी, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे. या हल्ल्यामध्ये हिंदू मारले गेले आहेत. तुमच्याकडे संपूर्ण जग, एवढेच काय पाकिस्तानसुद्धा कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कर्ता म्हणून पाहत आहे. आता येत्या एक-दोन दिवसांमध्ये तुमच्याकडून मोठ्या निर्णयाची अपेक्षा असून काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी, तेथील जनजीवन सुरळीत व्हावे आणि पाकिस्तानचे कंबरडे मोडले जावे, यासाठी ‘घुसून मारण्याची’ प्रक्रिया पार पडणार का? हीच उत्सुकता आहे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button