Pehalgam Terrorist Attack | पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

Pehalgam Terrorist Attack | जम्मू काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर भारत सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसभर परिस्थितीचा आढावा घेतला आणि ५ महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारला मोठा धक्का बसला आहे.
भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय पुढीलप्रमाणे :
१) १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्यास नकार देत नाही.
२) एकात्मिक चेक पोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. ज्यांनी वैध मान्यतांसह सीमा ओलांडली आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
३) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना (SVES) व्हिसाखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही SVES व्हिसा रद्द मानले जातात. SVES व्हिसाखाली सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी आहे.
४) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आलं आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवडा आहे. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण/नौदल/हवाई सल्लागार मागे घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयांमधील ही पदे रद्द मानली जात आहेत. दोन्ही उच्चायुक्तालयांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील मागे घेतले जातील.
५) १ मे २०२५ पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयांची एकूण संख्या सध्याच्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली जाईल.