breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या,..लाज वाटते

छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही-आम्ही सारे आहोत

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषी एक विधान केले. हे विधान जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच भोवणार आहे. आव्हाडांच्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली आहे.

इतर कुणी आहे म्हणून शिवाजी महाराज नाही.. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही-आम्ही सारे आहोत आणि तुमचेही आज महाराष्ट्रात अस्तित्व आहे, हे विसरू नका आव्हाड छी…लाज वाटते ..संताप वाटतो आव्हाड तुम्हाला ऐकताना… निषेध हा शब्द सुद्धा अपुरा आहे, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button