breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“लोकशाही सक्षम होण्यासाठी तरुणांना राज्यघटनेचे ज्ञान होणे गरजेचे”; दिनेश देशपांडे

पिंपरी : वाकड येथील आय. आय. ई. बी. एम. ट्रस्ट इंडस बिझिनेस स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या विजयरन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉइस एडमिरल दिनेश देशपांडे हे उपस्थित होते.

भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी विद्यार्थी तसेच तरुणांना राज्यघटनेचं ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात राज्यघटना शिकवली पाहिजे हे आवश्यक आहे. त्यामुळे भारताची लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, असे मत दिनेश देशपांडे यांनी व्यक्त केलं.

आत्मनिर्भर् भारत या योजनेविषयी अडमिरल देशपांडे यानी गौरवोद्गार काढले. तसेच भारत विविध क्षेत्रात आत्मनिर्भर होत असून तीस वर्षांपूर्वीच भारत हा नौदलामध्ये आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न झाला. तसाच तो आता संरक्षण क्षेत्रामध्ये ही यशस्वी होत असून तरुणांना भरपूर संधी आहेत. तरुणांनी संरक्षण क्षेत्रामध्ये यावे, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

तसेच या दिवशी इंडस बिझनेस स्कूल आणि इंडस चॅम्प्स स्कूल या दोन्ही विदयार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी आय.आय.ई.बी.एमचे अध्यक्ष कर्नल (नि.) विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, प्राचार्या इंडस चम्स स्कूल, प्रा.नम्रता जियानी, सह अधिष्ठाता डॉ भारती कालिया, डॉ विशाल भोळे, बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच या कार्यक्रमामध्ये इंडस बिझनेस स्कूल व इंडस चॅम्प्स स्कूल च्या विद्यार्थांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पडला.

विजेत्याची नावे पुढीलप्रमाणे

5 किमी श्रेणीत टॉप 5 विद्यार्थी

प्रथम स्थान – सुबेंदू मलिक
दुसरे स्थान – आदित्य चंद्र शुक्ला
तिसरे स्थान – सय्यद अली इर्शाद
चौथे स्थान – ऐश्वर्या श्रीवास्तव
5 वे स्थान – उज्ज्वल मोदी

10 किमी श्रेणीतील टॉप 5 विद्यार्थी

पहिला – सुजॉय दास
दुसरा – हर्ष परमार
तिसरा – विजेश शर्मा
चौथा – विवेक पटेल
5 वा – अभिमन्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button