JEE मेन्स परीक्षेसाठी आता 75 टक्के गुणांची आवश्यकता नाही
नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर JEE मेन्स परीक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2021-2022 या शैक्षणिक वर्षात JEE मेन्स परीक्षेसाठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. .
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मागील महिन्यात याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता JEE मेन्स परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणांच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. 12वी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुणांची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मागील महिन्यात केलेल्या घोषणेनुसार 2021 पासून JEE मेन्स परीक्षा वर्षातून 4 वेळा घेतली जाणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात आयोजित केली जाणार आहे. JEE मेन्स परीक्षेचं पहिलं सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या दरम्यान होणार आहे. JEE मेन्स परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांना NIT, IIT, SPA आणि CFIT सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा IIT सह टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12वी परीक्षेत 75 टक्के गुणांची अट रद्द करण्यात आली आहे.
Ministry of Education has decided to waive off 75% marks (in class 12 exam) eligibility criteria under JEE (Main) for the academic year 2021-2022 in respect of NITs, IIITs, SPAs and other CFTIs, whose admissions are based on JEE (Main).
— ANI (@ANI) January 19, 2021