उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे की नाही?
कोमट पाणी पिणे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर

मुंबई : वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येकजण थंड पाणी पित असतो. तसेच थंड फळांचे ज्यूस प्यायल्याने तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम मिळू शकतो, परंतु जास्त थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नसते. यावर अनेक रिसर्च झाले आहेत, ज्यात असे दिसून आले आहे की कोमट पाणी पिणे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारण्यासोबतच ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास देखील मदत करते. पण उन्हाळ्यात आपण कोमट पाणी पिऊ शकतो का?
असा प्रश्न अनेकांना पडतो. अशातच तुम्ही जेव्हा कडक उन्हातून घरी येता, तेव्हा तुम्ही लगेच थंड पाणी पिऊ नये, त्याऐवजी तुम्ही फक्त सामान्य पाणी प्यावे, त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही.
शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते
गरम पाणी तुमच्या शरीरातील घाण नैसर्गिक पद्धतीने काढून टाकण्यास मदत करते. तर थंड पाणी पिण्यामुळे शिरा आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. जर तुम्ही गरम पाण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या आकुंचन झालेल्या शिरा मोकळे होतात. तसेच मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुधारते.
आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते
पोट फुगणे किंवा पेटके येणे आणि पचनाच्या समस्या असल्यासही गरम पाणी खूप फायदेशीर आहे. थंड पाणी प्यायल्याने पोटाला किंवा शरीराला आणखीण त्रास होऊ शकतो. गरम पाणी तुमच्या पोटाचे तापमान कमी करते आणि एन्झाईम्सची क्रिया देखील मंदावते.
हेही वाचा – पुण्यात पिंक ई-रिक्षा वाटप कार्यक्रम; अजित पवारांनी पुरुष प्रवाशांचे फोटो काढण्याचा महिलांना दिला सल्ला
कोमट पाणी पिताना वेळेची काळजी घ्या
जर तुम्हाला कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर वेळेची विशेष काळजी घ्या. सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर अर्धा तासाने ते प्या. याचे तुम्हाला तात्काळ फायदे दिसतील. एनसीबीआयच्या एका संशोधनानुसार, कोमट पाणी पिणे आतडे सुधारण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
चांगले चयापचय
काही संशोधनातून असे दिसून आले आहे की गरम पाणी पिल्याने चयापचय वाढू शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
ताणतणाव कमी करणे
तुम्ही जर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायले तर तुमचा ताण आणि चिंता काही प्रमाणात कमी होते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी होण्यास, स्नायूंना आराम मिळण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच कोमट पाणी प्यायल्याने ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारे पेटक्यांचा त्रास कमी करण्यास आणि डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करण्यास देखील मदत करू शकते.