अलर्ट! राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवमान विभागाचा इशारा
पुणे : मान्सूनने काही दिवसांपुर्वी विश्रांती घेतली होती. मत्र आता हवामान खात्याने पुन्हा मान्सूनचा इशारा दिला आहे. कोकणातील जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा – PCMC : शरद पवार साहेबांवर श्रद्धा, पण साथ अजितदादांना; ‘अजित गव्हाणे टीम’ मुंबईला रवाना!
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1676447618149515265
५ आणि ६ जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्रात्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यामानाचा अंदाज आहे.