कायम हसरा चेहरा असणारा आयुष्मान खुराना एकाएकी का झाला भावुक?
आयुष्मान खुराना हा बॉलिवूड अभिनेता नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन येतो. त्याचे अनेक चित्रपटांतील भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन जातात. आयुष्मानने त्याच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आयुष्मान नेहमीच त्याच्या व्यक्तीरेखेवर प्रयोग करत असतो. आयुष्मान खुराना आणि दिग्दर्शक आनंद एल राय यांचा नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘अॅन अॅक्शन हिरो’ या चित्रपटाबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता-दिग्दर्शक जोडीने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे की हा चित्रपट त्यांच्यासाठी अनेक अर्थांनी खास आहे. कारण दिग्दर्शक अनिरुद्ध अय्यर, लेखक नीरज यादव, संगीत दिग्दर्शक पराग, सिनेमॅटोग्राफर कौशल शाह आणि इतर अनेकांचा हा पहिला चित्रपट आहे.
विशेष म्हणजे, आयुष्मान-जयदीप अहलावतचा ‘अॅन अॅक्शन हिरो’ चित्रपट 2 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अनिरुद्ध अय्यर दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसला तरी चित्रपटाची कथा आणि सर्व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडत आहे. आता चित्रपट फ्लॉप होताच आयुष्मान आणि आनंद एल राय यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
आयुष्मान आणि दिग्दर्शकाने एक भावनिक पोस्ट
आयुष्मान खुराना आणि आनंद एल राय यांनी लिहिले, “अॅक्शन हिरोच्या संपूर्ण प्रवासात, असे वाटले की आम्ही सिनेमाचे सर्वात नवीन विद्यार्थी आहोत, खरोखर काहीतरी रोमांचक आणि नवीन युग तयार करण्यासाठी तयार आहोत. अॅक्शन हिरोच्या सभोवतालच्या सर्व सकारात्मकतेने आणि तोंडी शब्दाने आम्ही नम्र आहोत. आम्हाला आशा आहे की हा स्नोबॉल अधिकाधिक लोकांना थिएटरमध्ये येण्यास मदत करेल. आम्ही नेहमी वेगवेगळ्या कथा आणि बॅक प्रोजेक्ट सांगण्याचा विचार करत असतो जे ताजे आहेत, जे अनोखे आणि व्यत्यय आणणारे आहेत. एका अॅक्शन हिरोसाठी आमच्या वाटेवर असलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमच्यासाठी, अॅक्शन हिरो ही एक दुर्मिळ स्क्रिप्ट आहे, एक असा चित्रपट आहे जो सर्जनशीलतेला पुढे ढकलण्यासाठी होता आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही येणाऱ्या दिवसांतही त्याचे प्रेम आणि कौतुक करत राहाल. प्रेम आणि समर्थन करत रहा.”

जाणून घ्या काय आहे अॅक्शन हिरोमध्ये
या चित्रपटात एक तरुण आणि लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आणि हरियाणातील राजकारणी यांच्यातील मांजर-उंदराचा खेळ दाखवण्यात आला आहे, जो एका गैरसमजातून निर्माण झाला आहे. जयदीप अहलावत यांनी या चित्रपटात राजकारणी भुरा सोलंकी यांची भूमिका साकारली होती, ज्यात जितेंद्र हुडा, हितेन पटेल, नीरज माधव आणि इतर सहाय्यक भूमिकेत आहेत. आनंद एल राय आणि भूषण कुमार यांनी कलर येलो प्रॉडक्शन आणि टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, मलायका अरोरा आणि नोरा फतेही कॅमिओमध्ये आहेत.





