मनी लाँड्रिंग प्रकरणात पत्रकार राणा अयुब यांच्यावर ईडीची कारवाई; १.७७ कोटींची संपत्ती जप्त
मुंबई | मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्रकार राणा अयुब यांच्यावर कारवाई केली आहे. ईडीने तपासासंदर्भात अयुब यांच्याकडून १.७७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने देणगी म्हणून मिळालेल्या पैशाचा वैयक्तिक खर्चासाठी वापर केल्याचा आरोप केला आहे. राणा अयुब या तहलका मासिकात पत्रकार होत्या. मात्र तहलताचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर त्यांनी तेथून राजीनामा दिला. तेव्हापासून स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्व वृत्तपत्रे व मासिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली.
ईडीने ही कारवाई गेल्या वर्षी उत्तर प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे, ज्यानुसार अय्युब यांनी मदत कार्याच्या नावाखाली ऑनलाइन क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म केट्टो द्वारे मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला पण कथितरित्या तो निधी स्वतःकडे वळवला असा आरोप आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सार्वजनिक देणगीदारांकडून उभारलेल्या धर्मादाय निधीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने पत्रकार राणा अय्युबच्या १.७७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी जप्त केल्या आहेत. हिंदू आयटी सेल नावाच्या एनजीओचे संस्थापक आणि गाझियाबादमधील इंदिरापुरमचे रहिवासी विकास सांकृत्यायन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. कीटोद्वारे मिळालेल्या संपूर्ण देणगीचा हिशेब आहे आणि एका पैशाचाही गैरवापर झालेला नाही, असे त्यावेळी अयुब यांनी सांगितले होते.
एका निवेदनात, ईडीने म्हटले आहे की त्याच्या चौकशीतून हे स्पष्ट होते की “चॅरिटीच्या नावावर निधी पूर्वनियोजित आणि पद्धतशीर पद्धतीने उभा करण्यात आला होता आणि निधीचा वापर ज्या उद्देशाने केला गेला होता त्या हेतूने तो पूर्णपणे वापरला गेला नाही. अय्युब यांनी स्वतंत्र चालू बँक खाते उघडून काही निधी कथितपणे तिथे वळवल्याचे तपासात आढळून आले आहे. राणा अय्युब यांनी किटोवर जमा केलेल्या निधीतून ५० लाख रुपयांची मुदत ठेव देखील तयार केली आणि नंतर ती मदत कार्यासाठी वापरली नाही. त्यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडात ७४.५० लाख रुपये जमा केले.”
तक्रारीनुसार, किट्टोने ऑगस्ट २०२१ मध्ये देणगीदारांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले होते की, ईडीकडून सांगण्यात आले होते की, अय्युबने सुरू केलेल्या तीन मोहिमांमध्ये जमा केलेला निधी जमा केलेला निधी त्या उद्देशासाठी वापरला गेला नाही, ज्या उद्देशाने ते उभे केले गेला होता. ते अजूनही संबंधित मोहिमांच्या खात्यात आहेत.
किटोने देणगीदारांना पाठवलेल्या ईमेलनुसार, अयुब यांनी झोपडपट्टीतील रहिवासी आणि शेतकऱ्यांसाठी तीन मोहिमा सुरू केल्या होत्या. त्यामध्ये आसाम, बिहार आणि महाराष्ट्रासाठी मदत कार्याचा आणि कोविड १९ मुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्याची मोहिमा होत्या.