breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार’; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अहमदगरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवाराबाबत भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ३५७ गावं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण घेतली आहेत. त्याच्या कामाला आपण सुरूवात करणार आहोत. गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार या योजनेला गती देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. पण यामध्ये जी काही पाणी धारण करण्याची क्षमता आहे. ती क्षमता वाढते आणि शेतकऱ्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. शासन आपल्या दारी या योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यास सुरूवात करणार आहोत. शेतकऱ्यांना १२ तास वीज दिवसादेखील मिळणार आहे.

हेही वाचा – WTC Final विजयी संघाला मिळणार एवढी रक्कम, ICC ने केली बक्षिसांची घोषणा

जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांना केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी, त्याचे टेंडर्स हे महाविकास आघाडीच्या काळात झाले. ते आमच्या कार्यकाळात झालेले टेंडर्स नाहीत. केंद्र सरकारने कधीही भेदभाव केला नाही. सगळा पैसा केंद्र सरकारचा होता. त्यावेळी महाविकास आघाडी काम करत होती. त्यामुळे काही तक्रारी आल्या असतील तर त्या तपासून बघू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button