breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#coronolockdown:लॉकडाऊन नसता तर रुग्ण 1 लाख असते, रुग्ण दुपटीचा दर 10 दिवसांवर : सरकारचा दावा

नवी दिल्ली. केंद्र सरकारने शुक्रवारी दावा केला की, देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. वेळेवर करण्यात आलेला लॉकडाऊन, देखरेखीचे तगडे नेटवर्क आणि कंटेनमेंटसह अन्य उपायांमुळे हे शक्य झाले. वेळेवर लॉकडाऊन केला नसता तर देशात रुग्णांची संख्या एक लाखावर पोहोचली असती. केंद्राच्या ११ गटांपैकी पहिल्या गटाचे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, त्यांच्या विश्लेषणानुसार लॉकडाऊन परिणामकारक ठरला. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले. आता १० दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. तर राष्ट्रीय रोग नियंत्रणचे संचालक एस. के. सिंह म्हणाले की, देशात पहिला रुग्ण आढळल्यानंतर देखरेख सुरू झाली होती. याची संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका आहे. सध्या ९.४५ लाख संशयित देखरेखीखाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button