breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | देशात कोरोना रुग्णांची संख्या 59 हजार पार
नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 59 हजार 662 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1981 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक म्हणजे 17847 कोरोना रुग्ण यामधून बरेही झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. दरम्यान मिशन वंदे भारतनुसार विदेशातील भारतीयांना आणण्याची प्रक्रिया सुरुच आहे. भारतात पोहोचताच या लोकांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जात आहे. शुक्रवारी रात्री 650 पेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले आहेत. दुबई, बहरीन आणइ रियाद येथून लोकांचा जत्था भारतात आला. सर्व यात्री एअर इंडियाच्या विशेष विमानातून परत आले आहेत.