राष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनानंतरचे संकट… १३ कोटी नोकऱ्यांवर गदा येणार; १२ कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जाणार
सध्या करोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे भारतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून देशात सरकारनं लॉकडाउन जाहीर केलं आहे. देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर यामुळे देशाचं अर्थचक्रही थांबलं आहे. दरम्यान, करोनामुळे देशातील १३.५ कोटी लोकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात अशी धक्कादायक बाब एका अहवालात नमूद करण्यात आली आहे. तसंच पैशाची आवक, खर्च आणि बचत यावरही विपरित परिणाम होणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.