#CoronaVirus : उद्या रेल्वे सेवा बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय
देशात करोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनंही पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च (रविवार) सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी या कालावधीत जनतेनं घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. आता यासोबतच रेल्वेनंही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे.
२१/२२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत.