breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र; गुन्ह्याचा कट रचणे व भ्रष्टाचाराचे आरोप

मुंबई: केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गुन्ह्याचा कट रचण्यासह भ्रष्टाचार हे प्रमुख आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचेही आरोपपत्रात नाव आहे. विशेष सीबीआय न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. तसे पत्रदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते, असा त्यांचा दावा होता. त्याबाबत सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिले. सीबीआयने २१ एप्रिल २०२१ ला गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. पुढे या प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचेही समोर आले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर सीबीआयने या तिघांची ‘ईडी’कडून कोठडी घेतली आहे. त्या अंतर्गतच गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी वसूल करण्यासाठी गुन्ह्याचा कट रचणे, खंडणी उकळणे व त्या रकमेचा गैरवापर करणे, अशा प्रकारचे आरोप या आरोपपत्रात देशमुख यांच्यासह पलांडे व शिंदे यांच्यावर आहेत. भारतीय दंडसंहितेतील गुन्ह्याचा कट व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा ४९ पानी आरोपपत्रात समावेश आहे.’ या संबंधित आरोपांखाली आर्थर रोड तुरुंगात असलेले अनिल देशमुख यांनी याआधीच्या विविध सुनावण्यांमध्ये हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याच वेळी सध्या त्यांच्या कोठडीअंतर्गतच वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button