breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीबरोबर जाण्याची इच्छा नसेल, पण..’; बच्चू कडू यांचा खोचक टोला

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

बच्चू कडू म्हणाले, शिवसेना सुरूवातीला मुस्लीम लीगबरोबर एकत्र होती. आता समाजवादी संघटनांबरोबर युती करत असेल, तर नवल काय? राजकारणात खुर्चीसाठी काहीपण, कधीपण आणि कुठेपण… काही राजकीय कार्यकर्ते विनाकारण निष्ठा दाखवतात. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनाही स्वप्न पाहिलं नव्हतं.

हेही वाचा – व्हाट्सअँपची मोठी घोषणा! ‘या’ स्मार्टफोन्सवर आता वापरता येणार नाही व्हाट्सअँप 

भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आले. देवेंद्र फडणवीस म्हणालेले ‘अविवाहीत राहील, मात्र राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही’. राजकारणात मी कुठं जाणार नाही, हे बोलता येत नाही. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा खूप राग होता. राष्ट्रवादीबरोबर जाणाची त्यांची इच्छा नसेल. पण, वरून आदेश आल्यावर फडणवीसांना राष्ट्रवादीबरोबर जावं लागलं. अमित शाहांनी ‘तुम्ही अविवाहीत राहू नका’ असं सांगितंल असेल.

सुधीर मुनगंटीवारांना वाघ नखांशिवाय माघारी यावं लागलं. ५०-६० लाख रूपयांचा खर्च करून ब्रिटनला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘डिजीटल इंडिया’ म्हणतात. आमचे मंत्री ब्रिटनला प्रत्यक्ष जाऊन माघारी येतात. हे चुकीचं आहे. मुनगंटीवार मोठे देशभक्ती मंत्री आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button