नितेश राणेंना जामीन मंजूर होताच निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जेव्हा बाहेर काढायचं…”
मुंबई |
भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत हा आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलंय. तसेच या प्रकरणी प्रशासनावर होता की नाही यावर बोलायची आज वेळ नाही. जेव्हा हे बाहेर काढायचं तेव्हा बाहेर काढू, असा सूचक इशाराही दिला. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आता आनंदाचा क्षण असल्याने यावर जास्त प्रतिक्रिया न देणे बरं होईल अशी प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे व नितेश राणे यांचे मोठे बंधू यांनी दिली तर नितेश राणे व राकेश परब दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेश नाकारला आहे. अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली तर यावेळी गावागावात फटाके फुटत आहेत आणि यापुढेही फुटतील अशी खोचक प्रतिक्रिया भाजप युवा नेते आनंद शिरवळकर यांनी दिली.
- “आज आनंदाचा दिवस आहे”
माजी खासदार निलेश राणे म्हणाले, “नितेश राणे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला याचा आनंद आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. ही सर्व कोर्टाची प्रक्रिया होती. त्यात आज जामीन मिळाला. काय काय घडलं हे बोलायची वेळ आज नाही. कोर्टाने जामीन मंजूर केलाय. आज आनंदाचा दिवस आहे.”
- “प्रशासनावर दबाव होता की नाही हे बोलायची आज वेळ नाही”
“हिंदीत एक म्हण आहे ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’ आज त्याचा नेमका अर्थ काय असतो ते कळलं आहे. प्रशासनावर दबाव होता की नाही हे बोलायची आज वेळ नाही. जेव्हा हे बाहेर काढायचं तेव्हा बाहेर काढू. आज आनंदाचा दिवस आहे एवढंच आज सांगतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं. नितेश राणे यांच्या तब्येतीविषयी विचारलं असता निलेश राणे यांनी नितेश यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं म्हटलं आहे. ते लवकरच बरे होतील, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.