भारतीय कैद्यांची सुटका करण्याचे पाकिस्तान सरकारला आवाहन, मच्छिमारांच्या यादीची देवाणघेवाण
नवी दिल्लीः दोन्ही देशांमधील दीर्घकालीन करारानुसार भारत आणि पाकिस्तानने रविवारी त्यांच्या ताब्यात असलेल्या नागरी कैदी आणि खलाशांच्या यादीची देवाणघेवाण केली. भारताने रविवारी पाकिस्तानला 631 भारतीय मच्छिमार आणि दोन नागरी कैद्यांची सुटका करून परत पाठवण्याचे आवाहन केले. हे असे कैदी आहेत ज्यांच्या तुरुंगवासाची मुदत पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे राष्ट्रीयत्व निश्चित झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- ‘याशिवाय, इस्लामाबादला पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या आणि भारतीय असल्याचे मानले जाणारे उर्वरित 30 मच्छिमार आणि 22 नागरी कैद्यांना तात्काळ कॉन्सुलर ऍक्सेस प्रदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’
कैदी आणि खलाशांच्या च्या याद्यांची देवाणघेवाण…
2008 च्या कराराच्या आराखड्यानुसार प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी असे करण्याच्या औपचारिकेचा भाग म्हणून दोन्ही देशांनी नागरी कैदी आणि मच्छिमारांच्या यादीची देवाणघेवाण करण्याची विनंती भारताने केली आहे..परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तानने आज नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये राजनैतिक माध्यमांद्वारे त्यांच्या ताब्यात असलेल्या नागरी कैदी आणि मच्छिमारांच्या यादीची देवाणघेवाण केली.”
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यातून नागरी कैदी, बेपत्ता भारतीय संरक्षण कर्मचारी आणि मच्छिमार आणि त्यांच्या बोटींची लवकर सुटका आणि त्यांना परत पाठवण्याचे सरकारने आवाहन केले आहे.