breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सर्व धागेदोरे मातोश्रीपर्यंत जातील, अनिल परब हे मातोश्रीचे…’; नीलेश राणे यांचा आरोप

राजापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ईडीच्या कारवाईच्या मुद्द्यावरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब हे मातोश्रीचे एजंट असल्याची बोचरी टीका राणे यांनी परब यांचा एकेरी उल्लेख करत केली आहे. अनेक धंदे करत आलेले अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई कधीतरी होणारच होती. मात्र अनिल परब हा विषय नसून याचे धागेदोरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतील. उद्या उद्धव ठाकरे यांनाही या कारवाईत घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको, असेही राणे पुढे म्हणाले.

कोकणात राजापूर येथे रिफायनरी प्रकल्प होणारच

कोकणात राजापुरात रिफायनरी होणारच असे सांगत शिवसेनेच्या विरोधाला आता दम राहिलेला नाही अशी बोचरी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे. नीलेश राणे हे रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्यासाठी आज राजापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीबाबत मंत्री अनिल परब व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला शाब्दिक हल्ला केला. अनिल परब हे मातोश्रीचा एजंट आहेत. त्यामुळे हे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोचणार. उदया उद्धव ठाकरे यांना या कारवाईमध्ये घेतले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. कारण अनिल परब हे त्यांचेच एजंट आहेत. त्यांची एजंटगिरी कोणासाठी होती हे चौकशीत बाहेर येईलच असेही राणे म्हणाले.

चंद्रकांत खैरेंवरही साधला निशाणा

चंद्रकांत खैरे यांची खासदारकी गेली त्यामुळे ते सरबरीत झाले आहेत. त्यात आता संजय पवार यांना खासदारकी मिळाल्याने भर पडली आहे. खैरे यांना शिवसेनेत किंमत राहिलेली नाही अशी टीका निलेश राणे यांनी खैरे यांच्यावर केली आहे. भाजपने एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडीला एक हजार कोटी दिले असे खैरे यांनी म्हटले होते या विधानाचाही निलेश राणे यांनी राणे स्टाईलने समाचार घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button