breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजी पुढे भारताचा संघ १०९ धावांवर गारद

INDvsAUS : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा प्रथम फलंदाजी करताना १०९ धावांवर डाव संपला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना खेळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी नऊ विकेट्स घेतल्या, तर शेवटची विकेट सिराज शुन्य धावांवर धावबाद झाला.

भारतीय संघाने फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. केएल राहुलच्या जागी युवा खेळाडू शुबमन गिल संघात होता. शुबमनने १८ चेंडूत २१ धावा केल्या. यानंतर चेतेश्वर पुजारा बाद झाला. अष्टपौलू खेळाडू रवींद्र जडेजा ४ धावांवर बाद झाला. विरोट कोहलीने ५२ चेंडूत २२ धावांची खेळी केली. श्रीकर भरत १७ धावा करत तर श्रेयस अय्यर १ धावांवर बाद झाला. भारताने उपाहारापर्यंत सात गडी गमावत ८४ धावा केल्या.

यानंतर लगेचच रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव हे बाद झाले. यानंतर खेळायला आलेला सिराज हा धावबाद झाला. तर अक्षर पटेल हा १२ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपट्टू मॅथ्यूने पदार्पणाच्या पहिल्या डावात पाट विकेट घेतल्या. तर लियॉनला तीन विकेट मिळाल्या. टॉन मर्फीला एक विकेट मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button