राज्यात उद्यापासून जोरदार पावसाचा इशारा!
गेल्या तीन-चार दिवसांपासून हवामानात काही अंशी बंद झाला असून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलीय. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र उत्तर भाग, गुजरात व राजस्थान या भागात ढगाळ वातावरण दिसत असल्याने हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलीय. गेल्या दोन दिवसांपूर्वी कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले होते. आता पुन्हा पाऊस सक्रीय होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे हवामान विभागाकडून आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून पालोदी अजमेरसह जमशेदपूर दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत पाऊस सक्रिय झालाय. तर, अरबी समुद्रापासून गुजरात पूर्व राजस्थान या भागात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्र राज्यात रविवारपासून (सप्टेंबर, 19) पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानने वर्तवलीय. त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे शेती कामांना देखील वेग आलाय.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र उत्तर भाग, गुजरात व राजस्थान या भागात पाऊस सक्रीय होण्याची चिन्हे असून म्यानमारच्या किनार्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली उद्या (सप्टेंबर, 19) ओडिसा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 19 सप्टेंबर रविवारपासून पुढचे तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.