breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रकाश सिंग बादल यांची पद्मविभूषण पुरस्कार वापसी!
नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत केला आहे.
प्रकाशसिंग बादल म्हणाले की, अत्यंत कडाक्याच्या थंडीचे आमचे शेतकरी बांधव रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकांचा निषेध करीत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा अमानुष छळ करीत आहे. त्याच्या निषेधार्थ मी माझा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.