Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

नेपाळमध्ये जलप्रलयाचा महाविनाश: मृतांचा आकडा १,२५९ वर, ५ हजारांहून अधिक बेपत्ता

काठमांडू | नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर आता पुनर्वसन आणि पुनर्बांधणीचे अवाढव्य आव्हान समोर आले आहे. पूरग्रस्त भागांत सुमारे २० हजार घरांची नव्याने उभारणी करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्रिशुली नदीचे खोरे आणि लगतच्या परिसरामध्ये मालमत्तेचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, पुराच्या नवव्या दिवशीही शोध, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, या महाप्रलयात आतापर्यंत १,२५९ जणांचा मृत्यू झाला असून ५,०८३ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. पंतप्रधान बालेन शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने पुराच्या १३ व्या दिवशी, म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी देशात ‘राष्ट्रीय शोकदिन’ जाहीर केला आहे. दरम्यान, अनेक पूरग्रस्तांनी बेपत्ता नातेवाईक जिवंत सापडण्याची आशा सोडून दिल्याने त्यांचे प्रतीकात्मक अंत्यविधी उरकण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा

छत्रपती संभाजीनगर हादरलं! एशियन हॉस्पिटलच्या NICUला मध्यरात्री भीषण आग; ९ नवजात बाळांसह ५८ रुग्ण सुखरूप

नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’चे (NDRRMA) प्रमुख धर्मराज उप्रेती यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा मांडला. ते म्हणाले, “आमच्या प्राथमिक अंदाजानुसार ७,५०० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत; ही घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली किंवा ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. याशिवाय वाचलेली अनेक घरे राहण्यायोग्य उरलेली नसल्याने तब्बल २० हजार घरे सुरक्षित ठिकाणी नव्याने उभारावी लागतील.”

बचावकार्यात लष्कराचे ९ हजार जवान तैनात

अपर त्रिशुली ३अ सह अन्य जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात बचाव पथकांना गुरुवारी काहीसे यश आले आहे. रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन आणि नवलपरासी पूर्व या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये नेपाळी लष्कराचे ९,३०० हून अधिक जवान बेपत्ता व्यक्तींचा कसून शोध घेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button