भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Building Collapsed in Bhiwandi | भिवंडी-निझामपूर महापालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. येथील ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही चार मजली निवासी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली अद्याप काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) तुकड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर चाललेल्या या बचाव मोहिमेत अत्याधुनिक उपकरणे आणि फ्लड लाईट्सच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दोन जणांना मलब्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात पथकांना यश आले आहे.
???? भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील गंगाराम वाडी परिसरात काल रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू.
इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं असून, अजूनही… pic.twitter.com/BjTFdjBLu7
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 31, 2026
हेही वाचा
रात्री अकरापर्यंत बैठका… सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांचा ‘ॲक्शन मोड’
इमारतीमध्ये ११ जण उपस्थित असल्याची शक्यता
प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये ६ मजूर आणि ५ स्थानिक रहिवाशांसह सुमारे ११ जण उपस्थित होते. त्यामुळे मलब्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असण्याची दाट शक्यता असून, शोध व बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे.
‘कोहिनूर अपार्टमेंट’ आधीच होती ‘धोकादायक’
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेली ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही इमारत अत्यंत जुनी आणि जर्जर झाली होती. भिवंडी-निझामपूर शहर महानगरपालिकेने या इमारतीला आधीच अतिधोकादायक म्हणून घोषित केले होते आणि ती रिकामी करण्याच्या नोटीस व सूचनाही दिल्या होत्या. मात्र, गुरुवारी रात्री सर्व नागरिक गाढ झोपेत असताना ही इमारत अचानक कोसळल्याने कोणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.





