breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
ही वेळ एकजूटीने लढण्याची, टीकेची नव्हे- खासदार संजय राऊत
नवी दिल्ली: कोरोना व्हायरस संकटाचा हा काळ एकजूटीने लढण्याचा काळ आहे. एकमेकांवर टीका करण्याचा नाहीय. काही लोक राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करतात. पण, टीका करुन काय साध्य होणार. सरकार जर काहीच करत नसेल तर मग कोरोना व्हायरस संक्रमित इतके लोक बरे कसे झाले आहेत. हे लोक भाभीजीचे पापड खाऊन बरे झाले का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केलेला आहे.