#CoronaVirus:देशात फक्त 13 दिवसांत वाढले 50 हजार कोरोना रुग्ण
नवी दिल्ली. लॉकडाऊनमधील सवलती आणि देशातील बहुतेक भागात आर्थिक कारभार सुरू होण्याबरोबरच कोरोनाबाधितांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. पाच मे रोजी देशांत रुग्णांची संख्या सुमारे ५० लाख होती. त्यानंतर १३ दिवसांत ५० हजार रुग्ण वाढले. या ५० हजार रुग्णांपैकी ३७,६८६ म्हणजे सुमारे ७४% रुग्ण दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या चार राज्यांतले आहेत. नवे १९,५३३ रुग्ण तर महाराष्ट्रातच आढळले. हे प्रमाण देशातील एकूण रुग्णांच्या सुमारे २०% आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातमधील स्थिती चिंताजनक आहे. १३ दिवसांत या राज्यांतील रुग्णसंख्या १० हजारांवर पोहोचली आहे. देशभरात बळींची संख्या दुप्पट झाली आहे.
३७% रुग्ण या तीन शहरांतच आहेत
मुंबई, अहमदाबाद व चेन्नई ही देशातील तीन शहरे गंभीर संसर्गाने ग्रस्त आहेत. देशात एकूण रुग्णांपैकी ३७% रुग्ण या तीन शहरांतच आहेत. मुंबईत २१,१५२, अहमदाबादेत ८,६८३ आणि चेन्नईत ७,११७ रुग्ण आहेत. रुग्ण वाढण्याचे प्रमाणही येथे सर्वात जास्त आहे.