स्वामी अग्निवेश यांच्या जाण्याने जनचळवळीची मोठी हाणी – काशिनाथ नखाते
पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, बंधूआ मुक्ती मोर्चा चे संस्थापक माजी शिक्षण मंत्री, लेखक असे विविध पैलू असलेले स्वामी अग्निवेश यांनी वंचित समाजासाठी व वेठबिगार मुक्तीसाठी खूप मोठे कार्य केले आहे यातूनच त्यांना पर्यायी नोबेल समजला जाणारा पुरस्कार “राईट लाईव्हलिहुड” हा त्यांना देण्यात आला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला स्वामीजींच्या जाण्याने चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे असे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथे महासंघातर्फे आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने,दिनेश राठोड, वंदना थोरात ,महादेव गायकवाड शकील शेख, इरफान चौधरी , निलेश गुजर, माधुरी जलमूलवार आदी उपस्थित होते.
स्वामीजी हे सुधारक विचारांचे पुरस्कर्ते होते. हरियाणा १९७७ मध्ये हरियाणा विधानसभेवर ते निवडून आले आणि शिक्षण मंत्री झाले. बंधूआ मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी श्रमिक कष्टकऱ्यांसाठी न्याय देण्याची भूमिका घेतली, धर्माधर्मात सुसंवाद हवा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, असंघटीत कामगार ,स्त्रीभ्रूणहत्या चळवळ, स्त्री मुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्याचबरोबर मेधाताई पाटकर, अण्णा हजारे यांच्याबरोबरही त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला स्वामी अग्निवेश यांचे कार्य हे सामाजिक संघटना ला नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे मत नखाते यांनी व्यक्त केले.