breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

ड्रॅगनच्या कुरघोडीवर संरक्षण मंत्रालयाचा मोठा खुलासा, तर जम्मूमध्ये उतरले फायटर हेलिकॉप्टर

लडाख: भारत-चीन लडाखमधील सीमारेषेवर तणाव निवळण्याचं नाव घेत नाही. ऑगस्टमध्ये दोन दिवस घुसखोरीच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा सोमवारी चीन आणि भारतीय सैनिकांकडून गोळीबार झाला. हा गोळीबार सुरुवातील भारतीय जवानांनी सुरू केल्याचा आरोपी चीननं केला होता. दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्यदलाकडून गोळीबार करण्यात आलेला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननंही गोळीबार सुरू केलेला असा दावा चीनच्या राष्ट्रध्यक्ष आणि सैन्य दलाकडून कऱण्यात आलेले आहे.

मात्र चीनच्या आरोपाचं खंडन संरक्षण मंत्र्यांनी केल्याची माहिती मिळालेली आहे. LAC वरी भारतीय सैन्यानं नाही तर सुरुवातील चीनच्या सैनिकांनी गोळीबार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेली आहे. भारतीय सेनेनं चीनचा डाव उधळून लावला वारंवार चीनकडून कुरापती होत असताना जवानांनी करडी नजर ठेवून चीनची खेळी हाणून पाडल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. दुसरीकडे भारतीय सैन्याचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष लागून आहे. त्यामुळे सैन्यदल हाय अलर्टवर असल्याची माहिती मिळालेली आहे.

भारत-चीन सीमारेषेवर वाढता तणाव लक्षात घेता जम्मू इथल्या किश्तवाडमध्ये अपाचे फायटर हेलिकॉप्टर उतरलेले आहेत. भारत-चीन सीमारेषेपासून किश्तवाड 210 किमी दूर आहे. पाडर परिसर ओलांडून हेलिकॉप्टर लडाखला जाऊ शकतंय. लडाखमधील नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याच्या वाढत्या कुरापतींमुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. सोमवारी किश्तवाडमध्ये प्रथमच फाइटर अपाचे हेलिकॉप्टर उतरले होते. त्या भागाच्या हेलिपॅडवर दोन अपाचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर वैमानिकांनी संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं एकावेळी 14 मिसाईल सोडता येऊ शकतात याशिवाय सलग 5 तास हे हेलिकॉप्टर काम करू शकतं इतकी याची ताकद असल्यानं भारतीय सैन्य आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button