‘स्वाभिमानी’ निवडणूक लढवणार, महाआघाडीकडे 50 जागेवर मागणी – राजू शेट्टी
सांगली |महाईन्यूज |प्रतिनिधी|
विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. काॅंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडे घटक पक्षांनी 50 जागांची मागणी केली असून आघाडीने 38 जागा सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
भाजप, शिवसेनेच्या विरोधात महाआघाडीचा एक घटक म्हणून ही निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. राजू शेट्टी यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 50 जागाचा दावा केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने 38 जागांचा आम्हाला प्रस्ताव दिला आहे. पण आम्ही आणि इतर छोटे पक्ष मिळून 50 जागांवर निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. तसेच स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यश रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला आहे. त्या जागेवर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील यांची प्रदेशाध्यशपदी हंगामी नेमणूक करण्यात आली आहे.