सुरुवातीला गाडी धक्के खाते, एकदा सुटली की सुसाट सुटते – खा. संजय राऊत
मुंबई | महाईन्यूज
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा मंत्री राजीनामा देतो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांकडे जातो किंवा राजभवनात जातो. अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला की नाही, याबाबतचं सत्य मुख्यमंत्री किंवा राजभवन सांगू शकतं.” गाडीला सुरूवातीला धक्के बसत असतात. परंतु, एकदा का गाडी सुरू झाली की ती सुसाट सुटते, अशा शब्दांत राऊत यांनी सत्तारांच्या राजीनाम्याला प्रत्युत्तर दिले.
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, हा राजीनामा आपल्याकडे आलाच नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली. शिवसेनेने अब्दुल सत्तारांना राज्यमंत्री देऊन त्यांचा सन्मान केला. शिवसेनेच्या कोट्यात जास्त विभाग नाहीत. सर्वांना अॅडजस्ट करावं लागतं. मुख्यमंत्र्यांनी सन्मान ठेवत अब्दुल सत्तारांना मंत्रिपद दिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
सत्तार नाराज का आहेत, ते मला माहित नाही. त्यांना मंत्री बनवलं आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. शिवसेनेच्या कोट्यात जास्त विभाग नाहीत. सर्वांना अॅडजस्ट करावं लागतं. मुख्यमंत्र्यांनी सन्मान ठेवत त्यांना मंत्रिपद दिलं आहे, असं राऊत यांनी नमूद केलं. गाडी सुरु होताना सुरुवातीला धक्के बसतात. सुरूवातीला गाडीला धक्का बसतो, पण एकदा सुरु झाली की सुसाट सुटते. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. 5 वर्ष पूर्ण करेल. 5 वर्ष भाजप विरोधात बसेल, असं संजय राऊत म्हणाले.