“सरकारने बकरी ईदमध्ये हस्तक्षेप केला तर आंदोलन करू”; ठाकरे सरकारला मुस्लिम बांधवांचा इशारा
“सरकारने बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी देणे अवघड केलं आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत”. महाविकास अघाडी सरकारने आमचा अपेक्षा भंग केला आहे. बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्यात सरकार अडथळे आणत आहे. हे थांबले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा मुंबईतील मुस्लिम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर मौलानांनी निशाणा साधला आहे. “सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत,” असे मोलानांनी म्हटलंय.. संबंधित मौलानांनी आरोप केला आहे, की दुसऱ्या राज्यांतून बकरे घेऊन येणारी वाहने सीमेवर अडवली जात आहेत. त्यांना चेकपोस्टवरून आत येण्यापासून रोखले जात आहे. पोलीस एका वेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत आहेत. यामुळे संबंधित लोकांना नाहक त्रास होत आहेत.
ऑल इंडिया उलेमा काउंसिलचे मौलाना मसूद दरयाबादी म्हणाले की, ‘आम्हाला आमचे मुस्लीम आमदार आणि मंत्र्यांवर विश्वास होता. आम्हाला आशा होती, की ते सरकारला सुधारित नियमावली जारी करायला सांगतील. त्यांनी बरेच प्रयत्न केले. एवढेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यात हस्तक्षेप केला. मात्र तरीही त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाहीये.
त्यामुळे आता बकरी ईदला घेऊन एक नविन वादाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.