breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत तुकाराम महाराजांची पालखी देहूनगरीत परतली

  • भक्ती-शक्ती ते देहूपर्यंत पालखी मार्गावर वृक्षारोपण

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. पालखी आज (रविवारी) देहूत परतली आहे.

परंपरेप्रमाणे आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला गेली होती. परतीच्या प्रवासात पालखीचा मुक्काम पिंपरीगावातील श्री भैरवनाथ मंदिरात असतो. त्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता पालखीचे आगमन झाले. या वेळी पावसाची रिमझिम चालू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक संदीप वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, हभप सतीश गव्हाणे, चंद्रकांत गव्हाणे, वासुदेव नाणेकर यांनी स्वागत केले. जोग महाराज प्रासादिक दिंडीतर्फे पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांची भोजन आणि निवासाची सोय करण्यात आली. मंदिरात रात्री ग्रामस्थांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, अजित मोरे, माणिक मोरे, सुनील मोरे, संतोष मोरे उपस्थित होते. रात्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे कीर्तन झाले.

पालखी आज (रविवारी) चिंचवड गावातील महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर, निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूह या मार्गे दुपारी तीनच्या सुमारास देहूमध्ये परतणार आहे. त्यानंतर यंदाच्या सोहळ्याची सांगता होईल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button