breaking-newsपिंपरी / चिंचवड
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५० दुचाकीस्वारांना वाकड पोलिसांनी पकडले
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शहरात विनाकारण फिरणाऱ्या ५० दुचाकीस्वारांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. संचारबंदीचे आदेश असतानाही अनेकजण विनाकारण शहरात दुचाकीवरून फिरत असतात. याबाबत आत्तापर्यंत ९०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसावा म्हणून वाकड पोलिसांनी आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तब्बल ५० दुचाकी जप्त केल्याची माहिती वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली.