breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विधानसभेसाठी भाजपा-शिवसेना महायुतीची पत्राद्वारे घोषणा
मुंबई |महाईन्यूज|
एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी (दि.३०) भाजपा-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
या पत्रकामध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा तसेच महायुतीतील रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या जागांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाला ३ जागा देण्यात आल्या असून यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट आणि फलटणची जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.