breaking-newsराष्ट्रिय

वाराणसीतील उड्डाणपुल मंदिर पाडल्यामुळे कोसळला- राज बब्बर

नवी दिल्ली : वाराणसीमधील उड्डाणपुल दुर्घटना ही मंदिर पाडल्यामुळेच झाल्याचे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी केले आहे. स्थानिकांच्या हवाल्याने त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी या दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

वाराणसीत मंगळवारी सांयकाळी सुमारे ५ वाचून ४५ मिनिटांनी केंट रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत १८ जणांचा बळी गेला होता तर २५ जण जखमी झाले होते. अपघातातील काही जखमींची स्थिती गंभीर आहे. याप्रकरणी बब्बर म्हणाले, मला सांगण्यात आले की, निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम होण्यासाठी तीन विनायक मंदिर पाडण्यात आले होते. हे मंदिर पाडल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याची लोकांची धारणा असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button