TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा, विधानसभा, महापालिका, आता ‘चाळ’ कमिटीच्या निवडणुकीतही भाजप नेत्यांनी उतरावे

भाजपचे दिल्लीतील मोठे नेते स्थानिक निवडणूकीतसुद्दा प्रचार करण्यासाठी येतात, प्रचारसभा घेतात. यवरूनच शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी आता चाळ कमिटीच्या निवडणुकीतही उतरावे, असा मिश्किल टोला आता शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपला लगावला आहे. अनिल परब म्हणाले की, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फक्त महापालिका निवडणूकच कशाला आमच्याकडे चाळ कमिटीच्या निवडणुका लागणार आहेत , त्यातही त्यांनी उतरावं.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली जाते, असा टोला परब यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button